भारतात चुकीची माहिती आणि द्वेषयुक्त भाषण हाताळण्यास फेसबुक असमर्थ; अहवालातून खुलासा

फेसबुकच्या माजी कर्मचाऱ्याने यासंदर्भात माहिती गोळा करत अहवाल तयार केला होता

फेसबुक भारतातील चुकीची माहिती आणि द्वेषयुक्त भाषण हाताळण्यात असमर्थ ठरला आहे. फेसबुकच्या अंतर्गत दस्तऐवजांवरून असे दिसून आले आहे की कंपनीला तिच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत, भारतामध्ये, चुकीची माहिती, द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचारावरील सामग्री हाताळण्यात अयशस्वी झाल्यामुळे समस्या येत आहेत. अमेरिकन माध्यमाच्या वृत्तानुसार, सोशल मीडिया संशोधकांनी असे निदर्शनास आणले आहे की असे गट आणि फेसबुक पेज आहेत जी भ्रामक, चिथावणीखोर आणि समुदायविरोधी सामग्रीने भरलेली आहेत.

न्यूयॉर्क टाइम्समध्ये शनिवारी प्रकाशित झालेल्या बातमीनुसार केरळच्या रहिवाशासाठी सोशल मीडिया वेबसाइट कशी दिसते हे पाहण्यासाठी फेसबुकच्या संशोधकांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये नवीन अकाऊंट तयार केले होते

हे वाचले का?  Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

वृत्तपत्रानुसार, पुढील तीन आठवडे अकाऊंट सामान्य नियमांनुसार चालवले गेले. ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि साइटच्या नवीन पेजसाठी फेसबुकच्या अल्गोरिदमने केलेल्या सर्व शिफारशींचे पालन केले गेले. त्यानंतर द्वेषयुक्त भाषण, चुकीची माहिती आणि हिंसाचाराच्या घटनांवर आनंद साजरा करणाऱ्या घटनांची माहिती वापरकर्त्या समोर येऊ लागली. फेसबुकने त्या महिन्याच्या शेवटी प्रकाशित केलेल्या अंतर्गत अहवालात ही सर्व माहिती एकत्र केली.

न्यू यॉर्क टाईम्स आणि असोसिएटेड प्रेससह वृत्तसंस्थेने यासंदर्भात आपला अहवाल दिला आहे. “कंपनी चुकीची माहिती, द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचाराच्या घटनांवर आनंद साजरा करणाऱ्या घटना यांच्याशी झुंज देत असल्याचे अंतर्गत कागदपत्रे दाखवतात,” असे या अहवालामध्ये म्हटले आहे.

हे वाचले का?  Wayanad landslides Neethu Jojo: भूस्खलनाची पहिली माहिती देणारी ‘ती’ वाचू शकली नाही; वायनाडमध्ये त्या रात्री काय झालं?

न्यूयॉर्क टाईम्सने फेसबुकच्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, भारतातील २२ मान्यताप्राप्त भाषांपैकी केवळ पाच भाषांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सामग्रीचे विश्लेषण करण्याची सुविधा आहे, पण हिंदी आणि बंगालीचा आत्तापर्यंत समावेश करण्यात आलेला नाही. ही माहिती फ्रान्सिस होगेन यांनी गोळा केलेल्या सामग्रीचा भाग आहेत जे फेसबुकचे माजी कर्मचारी असून त्यांनी कंपनी आणि तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल अमेरिकेच्या सिनेटसमोर साक्ष दिली होती.

अहवालात म्हटले आहे की, अंतर्गत कागदपत्रांमध्ये “देशातील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्याशी जोडलेली बनावट खाती भारताच्या राष्ट्रीय निवडणुकांवर परिणाम करत असल्याचा तपशील समाविष्ट आहे.” २०१९ च्या राष्ट्रीय निवडणुकांनंतर तयार करण्यात आलेल्या एका वेगळ्या अहवालात फेसबुकला आढळले की, भारतातील पश्चिम बंगाल राज्यात ४० टक्क्यांहून अधिक दृश्ये बनावट/अयोग्य आहेत, असे वृत्तपत्राने म्हटले आहे.

हे वाचले का?  PM Modi calls Biden: पंतप्रधान मोदींचा बायडेन यांना फोन; युक्रेन दौरा आणि बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षिततेवर चर्चा