पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत

विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: देशात सर्वदूर प्रामुख्याने उत्तर भारतात सुरू झालेल्या पावसामुळे गेल्या काही दिवसांत रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर कोलमडली आहे. उत्तर भारतातून भुसावळ-मनमाडमार्गे मुंबईला जाणार्‍या आणि मुंबईहून परतीचा प्रवास करणार्‍या लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची मोठी कोंडी होत आहे.

हे वाचले का?  पहिल्या यादीत साडेचार हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड; सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

मनमाड हे जंक्शन रेल्वे स्थानक असल्याने येथून परप्रांतात रेल्वेद्वारे जाण्यासाठी अहोरात्र प्रवाशांची वर्दळ असते. सध्या पावसामुळे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी अयोध्या-कुर्ला साडेपाच तास, दिब्रुगड-कुर्ला साडेतीन तास, हावडा-पुणे २१ तास, शालिमार-कुर्ला १७ तास, गोरखपूर-कुर्ला काशी एक्सप्रेस पाच तास, कुर्ला-गोरखपूर सहा तास, गोरखपूर-पुणे सुपरफास्ट तीन तास आणि दानापूर-पुणे तब्बल दोन तासांच्या विलंबाने धावत असल्याचे दिसून आले. पावसामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जाते. विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

हे वाचले का?  संविधान वाचविण्यासाठी राज्यभर सभांव्दारे प्रबोधन – श्याम मानव यांची मोहीम