राज्यभरात गारठा; पुण्यात हुडहुडी

राज्यात सुरुवातीला विदर्भ आणि मराठवाडय़ातील तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली होती.

पुणे : कोरडय़ा हवामानाची स्थिती आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात सर्वत्र किमान तापमानाची घसरण कायम आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातील तापमानात किंचित वाढ झाली असली, तरी तेथे रात्रीचा गारवा आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, पुणे शहरात गुरुवारी राज्यातील नीचांकी ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

हे वाचले का?  Rohit Pawar on Narendra Modi: “भटकत्या आत्म्याची भीती अजूनही…”, रोहित पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “महाराष्ट्रात येणं…”!

राज्यात सुरुवातीला विदर्भ आणि मराठवाडय़ातील तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली होती. चार ते पाच दिवसांपूर्वी या भागांत थंडीच्या लाटेची स्थिती होती. त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील तापमानाचा पाराही घसरला. कोकण विभागात मात्र दोन दिवसांपासून किमान तापमान सरासरीच्या खाली गेले आहे. या विभागांत मुंबईसह रत्नागिरी, अलिबाग परिसरात रात्रीचे तापमान सरासरीखाली आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे शहराचा पारा गुरुवारी घसरून थेट १० अंशांच्या खाली आला. त्यामुळे नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाचा नवा विक्रम नोंदविला गेला. नाशिक, जळगाव, सांगली आदी भागातही थंडी आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद, परभणी, बीड आदी भागांत तापमानाचा पारा घसरला आहे. विदर्भात किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली, तरी थंडी कायम आहे.

हे वाचले का?  Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम

राज्यात सर्वच ठिकाणी सध्या किमान तापमान सरासरीच्या खाली आहे. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात रात्रीची थंडी कायम आहे. हवामानाची पुढील स्थिती लक्षात घेता तापमानात हळूहळू वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. दिवाळीच्या कालावधीत तापमानात किंचित वाढ अपेक्षित आहे.

किमान तापमान :  रत्नागिरी (१७.५), पुणे (९.८), जळगाव (१०.७), कोल्हापूर (१६.०), महाबळेश्वर (१३.४), नाशिक (१०.४), सांगली (१४.१), सोलापूर (१५.२), औरंगाबाद (१२.८), परभणी (१३.०), नांदेड (१५.५), बीड (१२.९), अकोला (१३.४), अमरावती (१४.१), बुलढाणा (१४.२), ब्रह्मपुरी (१९.६), चंद्रपूर (११.२), गोंदिया (१४.५), नागपूर (१८.३), वाशिम (१४.०), वर्धा (१६.८). (अंश सेल्सिअस)

हे वाचले का?  Maharashtra News Live: ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “त्याला पाच कोटी आणि…”