Shiv Jayanti 2024 ‘शिवरायांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध,’ मुख्यमंत्र्यांचे शिवनेरी येथील सोहळ्यात उद्गार

Shiv Jayanti 2024 Celebration शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकुशलतेचे सोमवारी वर्णन केले.

Chhatrapati Shivaji Maharaj Janmotsav पुणे : छत्रपती शिवराय आई भवानीला कौल मागण्याइतके धार्मिक होते. तेवढेच ते व्यवहारी आणि विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी मायेने आपल्या प्रजेचा सांभाळ केला. छत्रपती शिवरायांनी तलवार हाती घेतली पण ती कधी निष्पापांच्या रक्ताने माखून दिली नाही. त्यामुळे शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकुशलतेचे सोमवारी वर्णन केले.

हे वाचले का?  Maharashtra News Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; नाशिकमध्ये सभा तर मुंबईत रॅली

किल्ले शिवनेरीवर झालेल्या शिवजन्माच्या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थित होती. त्याप्रसंगी शिंदे बोलत होते.

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाची आठवण सांगताना शिंदे म्हणाले की, पाकिस्तानकडे तलवार रोखून धरणारा पुतळा पाहून माझ्या अंगात उर्जा संचारली. त्या पुतळ्याकडे पाहून पाकिस्तानची कधीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. लवकरच लंडनच्या वस्तुसंग्रहालयातील शिवरायांची वाघनखे भारतामध्ये आणली जाणार आहेत.

हे वाचले का?  त्र्यंबकेश्वरसाठी महाशिवरात्रीनिमित्त आजपासून जादा बससेवा

फडणवीस म्हणाले, की शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवले. अन्याय करणारा कितीही मोठा असो देव, देश आणि धर्मासाठी लढणारा जिंकतो. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात लढायला शिकवले. आम्हीही शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करत आहोत.  पुरातत्व विभागाच्या कामांच्या पद्धतीमुळेच गड किल्यांच्या विकासाला अडथळा येतो. मात्र, यामधे बदल करण्यात आला आहे.

पवार म्हणाले, की सर्व जाती, धर्मांना एकत्र करून गुलामगिरीच्या विरोधात लढले पाहिजे हे शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनावर बिंबवले. महायुती सरकार गड-किल्ल्यांसाठी काम करत असून गडासाठी ८३ कोटी खर्च करण्यात आले आहेत. या बरोबरच इतर गडकिल्ल्यांच्या जिर्णोद्धार करण्याचे काम करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.